Saturday 30 December 2017

पदार्थात होणाऱ्या भौतिक बदलांचा अभ्यास (Appreciating the physical changes in substances)

बदल हा तर निसर्गाचा स्वभाव गुण..सतत बदलत राहणं, जुन्याच्या जागी नवं घेणं, नवी पालवी फुटणं. नवेपणा जाऊन जीर्णपणा येणं. उन्हा मागून पाऊस, पावसानंतर शिशिर, मग शरद असं फेर धरून चालणं हे निसर्गाचं नित्याचं काम. काही बदल होत राहतात. यातील काही कायम टिकतात. काही तात्कालिक व पुन्हा मागील पाढे पंचावन्न. नदीच्या पाण्यात घासल्या जाणाऱ्या दगडांचे क्षार मिसळून नष्ट झाले म्हणता म्हणता उन्हाळ्यात नदी कोरडी झाली की क्षारांनी पुन्हा आपलं डोकं वर काढाव. एखाद्या टपून बसलेल्या शत्रूने संधी येताच डोकं काढावं तसं.

“विक्रमा खरंच मला तर ह्या बदलांचं काही कळेनासंच झालंय बघ. पाण्यात मीठ मिसळाव. मग ते नष्ट झाल्याचं वाटून पाणी मात्र खारट झालेलं असतं. पुन्हा त्या पाण्याला उकळलं तर पाण्याचं बाष्प व्हावं व मीठ खाली राहावं..ही काय भानगड आहे? ह्या बदलाला कारण झालं कोण? स्पर्श किंवा तापमान बदललं कशामुळे?”

“वेताळा, तेजाचा तापमानाशी समवाय संबंध आहे असं आपण मागच्या एका अमावस्येला बोललो होतो. तापमानात घट झाली म्हणजे तेज गुण बदलला. प्रशस्तपाद म्हणतात
कारणत्वञ्चान्यत्र पारिमाण्डल्यादिभ्य: |
The quality of being the cause belongs to all (substances, qualities and actions) except the atomic measure.
दुसऱ्या कशालातरी कारण होणे हे विशेषत्व सोडून बाकी सर्वांना लागू होते.”

“नाही, म्हणजे ते ठीक आहे. पण हे विशेष अंग सोडून बाकी अंगे ते पदार्थ बदलतात कधी? आणि कोण त्यांना बदलतं?”

“अगदी बरोबर ठिकाणी नेम धरतोयस वेताळा..वर सांगितल्या प्रमाणे पदार्थाची सर्व अंगे ही द्रव्यांमुळेच असतात. म्हणूनच हा बदल सुद्धा कोणत्यातरी द्रव्यानेच होतो. याचा अर्थ असा होतो की पदार्थातील द्रव्ये ही त्यातील इतर द्रव्यांवर परिणाम घडवून आणतात. वर मी सांगितलंच आहे तेज गुण पाण्यावर कसा परिणाम करतो ते.”

“पण विक्रमा हा बदल घडवतं कोण?”

“वेताळा मागे सुद्धा मी हे सांगतलं होतं. प्रशस्तपादऋषींनी म्हटलंय
गुणादीनां पञ्चानामपि निर्गुणत्वनिष्क्रियत्वे |
To the five, Quality and the rest, also belong the character of being devoid of qualities, and that of being without action.
फक्त द्रव्यांनाच गुण(properties) असतात व त्यांच्याच बाबतीत कर्मे(actions) संभवतात, सामान्य संभवतात, विशेष असतात व समवाय संबंधही असतात. पण द्रव्यांशिवाय गुणकर्मसामान्य,विशेष व समवाय हे निष्क्रीय असतात व त्यांना स्वत:चे कोणतेही अस्तित्त्व उरत नाही. 

याचा एवढाच अर्थ होतो की पदार्थातील पृथ्वी, आप, तेज, वायू व मन ही द्रव्ये एकमेकांवर परिणाम करत असतात. स्थल, काल ही केवळ नैमित्तिक आहेत. प्रशस्तपाद ऋषी म्हणतात
क्षितिजलज्योतिरनिलमनसां क्रियावत्त्वमूर्त्तत्वपरत्वापरत्ववेगवत्वानि ||
To Earth, Water, Fire, Air and Mind belong the character of having actions, being corporeal, having distance and proximity, and having speed.
स्थायू, द्रव, वायू, तेज व मन हे हालचाल करत असतात, त्यांना मूर्त स्वरूप असते, ते जवळ येऊ शकतात व लांब जाऊ शकतात आणि ते बलप्रयोग करून गती निर्माण करू शकतात.

“अच्छा म्हणजे ही द्रव्ये बलप्रयोगाने बदल घडवतात...पण विक्रमा हे बदल कुठपर्यंत?”

“वेताळा हीच ती भौतिक व रासायनिक बदल यांमधील सीमारेषा..पदार्थात होणारा बदल जोपर्यंत त्याचा विशेष कायम ठेवतो म्हणजे पाण्याचा रेणू हा कायम राहतो तोपर्यंत तो भौतिक बदल(physical change). लाकडाच्या ओंडक्याचे तुकडे करत गेलो तर तोही भौतिक बदल. कारण या दोन्ही उदाहरणात पाणी किंवा लाकडाचा विशेषकण हा पाण्याचा रेणू व लाकडातील लहानात लहान रेणूच राहिला. पण मी जर ते लाकुड शेकोटीला वापरले तर तो भौतिक बदल राहिला नाही कारण लाकडाची राख झाली व उष्णता बाहेर पडली. लाकडाचं विशेष अंग बदललं व राख निर्माण झाली. हा झाला रासायनिक बदल(chemical change).”

“अच्छा म्हणजे पदार्थाचे विशेष अंग कायम राखून बाकी द्रव्य, गुण, कर्म, सामान्य व समवाय संबंध यांमध्ये जर बदल झाला तर तो झाला भौतिक बदल. पण जर पदार्थातला हा बदल विशेषत्वाला बदलून गेला तर त्या पदार्थाचे मूळच बदलले व त्यात रासायनिक बदल झाला असे आपण म्हणू शकतो.”

“एखादे उदाहरण देतोस विक्रमा?”

“म्हणजे पाणी, साखर, चहा यांच्या मिश्रणाला उष्णता दिली तर तो एक भौतिक बदल झाला. पण याच मिश्रणात दूधही ओतलं व ते नेमकं नासलं तर त्या दुधात रासायनिक बदल झाला व तो चहाच वाया गेला.”

“असं असं..पण या द्रव्यांच्या गुणांमध्ये फरक झाल्याने इतरांवर परिणाम होतोय हे खरंय. पण हे सगळं करतंय कोण? कशासाठी?”

“पाश्चात्य भौतिकशास्त्रामध्ये एखाद्या बाह्यबलावर यासर्वाची जबाबदारी ढकलली जाते. पण वैशेषिकात या बाह्यबलासोबतच मन व आत्मा ही द्रव्ये असल्याने हे बदल घडवण्याची जबाबदारी साहजिकच आत्म्यावर येऊन पडते. आत्म्याचे बुद्धि, सुख, दु:ख, इच्छा, द्वेष व प्रयत्न हे गुण सांगितले आहेत. शिवाय त्याला हेतु सुद्धा असतो. या हेतूवरही या भौतिक तसेच रासायनिक बदलांची जबाबदारी येऊन पडते. हा आत्मा मनाच्या सहाय्याने हे प्रयत्न करतो. वैशेषिकात मनाचे संख्या(number), परिमाण(unit), पृथकत्व(separateness), संयोग(conjunction), विभाग(disjunction), परत्व(largeness), व अपरत्व(smallness)  हे गुण सांगितले आहेत. आत्मा हा या अवयवांमधील पेशींच्या सहाय्याने हे बदल करतो किंवा तसा प्रयत्न तरी करतो.”


“सूत्ररूपात सांगायचं तर कसं बरं सांगशील विक्रमा?”

“तसं वैशेषिकात तर तसं थेट सूत्र नाही, पण संक्षेपात सांगायचं झाल्यास
  • पदार्थाच्या द्रव्य, गुण, कर्म, सामान्य व समवाय यांच्यात बदल झाला पण विशेष बदललं नाही, तर तो भौतिक बदल
  • पदार्थाच्या द्रव्य, गुण, कर्म, सामान्य व समवाय यांच्यातील कोणत्याही बदलासह विशेष अंगात बदल झाला तर तो रासायनिक बदल.”




“चांगला प्रयत्न आहे विक्रमा..पदार्थविज्ञानात असलेले हेतूचे स्थान सांगण्याचा. पण आता या ठिकाणी मला थांबता येणार नाही. तसा प्रयत्नही करु नकोस. मला जावंच लागेल. आत्मा तर माझ्यातही आहे. फक्त भूतद्रव्ये नाहीत तुझ्या शरीरात आहेत तशी. असो. पण पदार्थाच्या अवयवांना जाणवणाऱ्या द्रव्य, गुण व कर्म या अंगांमध्ये काही साम्ये आहेत का? प्रशस्तपादांनी त्याबाबतीत काही म्हटलंय का? तेच सामन्य, विशेष व समवाया संबंधातही विचारायंय..त्यांच्यातही काही समानता आहे का? पण आता मी निघतो. पुन्हा भेटू..हाऽहाऽऽहाऽऽऽ”

वेताळही पदार्थविज्ञानाच्या कक्षेत येतो..निदान तो तसं म्हणतो हे पाहून जंगलातील इतर अदृष्य आत्म्यांनीही कान टवकारले. विक्रम वेताळाच्या गोष्टींचा पोरकटपणा म्हणून उपहास करणारे ते आत्मेसुद्धा पुढच्या अवसेची व त्यांच्या भेटीची वाट पाहू लागले..


(क्रमश:)

पदार्थाच्या सहा अंगांच्या अभ्यासाची सुरुवात कशी करायची? (Getting started with the study of the six facets of Padartha)

राजा विक्रमाची आणि वेताळाची भेट ही केवळ विक्रमासाठी किंवा प्रजाजनांसाठीच नव्हे तर जंगलातल्या सर्व स्थिर चरांसाठी औत्सुक्याचा विषय ठरू लागली होती. कारण त्या भेटींमध्ये आता पदार्थविज्ञानाच्या मुख्यत: वैशेषिक पदार्थविज्ञानाच्या आधारस्तंभांविषयीम्हणजे द्रव्य(substance), गुण(properties), कर्म(actions), सामान्य(classification), विशेष(individuality) व समवाय(inherence) – या पदार्थाच्या सहाअंगांविषयी अधिक उत्सुकता निर्माण झाली होती. जणू लोकांच्या हातात कोणीतरी खजिन्याच्या चाव्याच दिल्या होत्या. पण या चाव्यांनी कुठलं कुलुप उघडतं हे कळत नव्हतं. शिवाय यातील पहिलं कुठलं अंग तपासायाचं, या सहा अंगांमध्ये काही साम्य आहे का? वगैरे अनेक प्रश्न आता वैशेषिकात रस घेऊ लागलेल्या जिज्ञासूंना पडू लागले होते.

“काय रे विक्रमा, पदार्थाची सहा अंगे सांगितलीस, उदाहरणेही सांगितलीस, पण या अभ्यासाची सुरुवात कशी करायची हे सांगितलंच नाहीस? अभ्यास करताना पहिलं द्रव्य पहायचं का गुण हे पण नाही सांगितलंस..”विक्रमाच्या शक्तिवान खांद्यावर आरूढ होत वेताळाने त्याच्या प्रश्नाची सरबत्ती सुरु केली.

“वेताळा एखाद्या वस्तूला मग ती जमीन, पाणी, ऊन यांसारखी इंद्रिय गोचर असो वा तरंग, स्थल, काल, मन इत्यादि बुद्धीला कळणारी असो, त्या वस्तूला जेव्हा माणसाने अभ्यासायला सुरुवात केली, तस तसे त्याला वेगवेगळे अर्थ प्राप्त व्हायला सुरुवात झाली. प्रशस्तपादांच्याच शब्दांत

षण्णामपि पदार्थानामस्तित्त्वाभिधेयत्वज्ञेयत्वानि |11|
(To all the six categories belong the properties of being-ness, predicability and congnisability.)
पदार्थाच्या साही अंगांमधले साम्य म्हणजे त्यांना अस्तित्व असते, शब्दांत व्यक्त करता येते व ती जाणून घेता येऊ शकतात.

म्हणजेच पदार्थातील द्रव्ये, गुण, कर्मे इत्यादि सहा अंगांद्वारे त्या वस्तूला विविध अर्थ प्राप्त होतात व माणूसच त्याला पदार्थ म्हणजेच 'विविध अर्थ प्राप्त असलेली वस्तू' करून टाकतो. अजाणतेपणाकडून जाणतेपणाकडे जायचा हा प्रवास.”

“उदाहरण दे रे उदाहरण..”

“ समजा एक सैनिक लढतालढता शत्रुदेशाच्या सीमेलगत आलाय. गुप्तचरांनी सांगितल्यानुसार सर्वत्र भुसुरुंग तसेच तापलेले लोहगोळे पडलेले आहेत अशी त्याला खबर आहे. प्रत्येक पाऊल तो सावधपणे टाकतोय.  समोर एखादी अज्ञात वस्तू पडलेली आहे..ती टणकशी वाटतेय, राखाडी मातीपासून वेगळी दिसतेय, लोखंड वगैरे एखादा धातूच असावा पण रंगावरून तर तसे वाटत नाहिये..मग लक्षात येते की तप्त लोखंड हे जरा लालसरपणाकडे झुकते..हे झालं तोफगोळे हुडकण्याविषयी..भुसुरंगासाठीही तो प्रत्येक ठिकाणी चाचपत पुढे जातो..जमीन सगळीकडे सारखीच टणक आहे, का काही ठिकाणी तो टणकपणा कमी जास्त होतोय, रंग बदलतोय हे तो पाहात जातो. म्हणजेच तो पहिल्यांदा  द्रव्य ओळखतो, मग त्या द्रव्याचे गुण, मग हालचाली, मग ते द्रव्य कुठल्या गटात मोडते, शिवाय त्या द्रव्याचे विशेष काय आणि त्या मग ते द्रव्य पदार्थाचे अविभाज्य घटक आहे का कसे हे पाहतो..कारण या श्लोकातच म्हटल्याप्रमाणे या सहाही गुणांना काही विशिष्ट अस्तित्व असते, ती जाणून घेता येतात व ती शब्दांमध्ये व्यक्तही करता येतात..”




“अरे उदाहरणातच रममाण झालास..पण हे सांग की ही द्रव्ये आहेत की नाहीत हे कसे कळायचे?”

“वेताळा प्रशस्तपाद ऋषींनी म्हटलंय
‌आश्रितत्वञ्चान्यत्र नित्यद्रव्येभ्य:||12||
The character of being dependant (upon something else) belongs to all things except the eternal substances.
स्थायू (solid), द्रव(liquid), तेज (energy), वायू(gas) ही भूतद्रव्ये इतरांवर अवलंबून असतात. आकाश(plasma), काल(time), स्थल(space), आत्मा(self/atma) व मन(mind) ही महाभूतद्रव्ये इतरांवर अवलबून नसतात.

आपल्या गोळ्याच्या उदाहरणात लोखंड हे पृथ्वीद्रव्य व उष्णता हे तेजद्रव्य ही भूतद्रव्ये आहेत. ही द्रव्ये इतर घटकांवर अवलंबून असतात. म्हणजे पृथ्वीरूप हे तेजावर अवलंबून आहे. हाच गोळा सूर्यावर असता तर तेथील तेजरूप उष्णतेमुळे तर ते आकाशरूपात(plasma) अवस्थेत असते. पण हे अवलंबित्व फक्त पृथ्वी, आप, तेज व वायू यांनाच लागू पडते. बाकीची द्रव्ये म्हणजे आकाश, काल, स्थल, मन व आत्मा ही इतरांवर अवलंबित किंवा आश्रित नसतात.”

“म्हणजे या ठिकाणी तू स्वतंत्र व परतंत्र द्रव्ये सांगितलीस. भूते ही एकमेकांवर अवलंबून असणारी द्रव्ये आहेत व महाभूते ही स्वतंत्र आहेत असे तू म्हणतोस. पण ही द्रव्ये तिथे आहेत हे मुळात कळतंच कसं?”

“अरे वेताळा, द्रव्य ओळखण्यासाठी त्याचा गुणच ओळखावा लागतो. हा गुणच ते द्रव्य तिथे आहे हे सांगतो. या अतूट संबंधालाच समवाय संबंध म्हणतात. या समवायामुळेच तर द्रव्य कळतं..माणसाला पदार्थाचं तापमान जाणवलं की तिथे उष्णता किंवा तेजद्रव्य आहेच हे कळतं. आवाज आला की आकाश द्रव्य कळतं. असे या पदार्थाच्या द्रव्य, गुण, कर्म, सामान्य व विशेष यांमध्ये कुठल्यानाकुठल्या प्रकारचे समावाय वा अतूट अन्योन्य संबंध अस्तित्त्वात असतातच. प्रशस्तपाद म्हणतात
द्रव्यादीनां पञ्चानां समवायित्वमनेकत्वञ्च  ||13||
To the five, Substance and the rest, belong the characters of inherability and plurality.
द्रव्ये, गुण, कर्म, गट व विशेष हे संख्येने अनेक आहेत व ते अविभाज्य घटकांचे बनलेले असतात.

जसं आपण पाहिलं तसं द्रव्ये ९ आहेत. त्यांचे एकुण २४ गुण आहेत. त्यांच्या हालचाली या ५ मुख्य प्रकारच्या आहेत. शिवाय त्यांचे गट तर अनेक आहेत. शिवाय त्या पदार्थांचे विशेषगुण म्हणजे लहानात लहान कण हे त्यांमधील द्रव्यांनुसार अनेक आहेत. शिवाय आपण आधी म्हटलं तसे त्यांमध्ये समवाय संबंधही आहेत.”

“हे ठिक आहे रे विक्रमा, पण हा समवाय का काय त्याचा जरा आधुनिक संदर्भ दे रे..स्पष्ट कर जरा..अनेक समवाय संबंध कसे ते ही सांग”

“समजा आधुनिक युगातला भ्रमणध्वनी आहे तुमच्याकडे. तर त्यावर असलेली माहिती म्हणजे फोटो किंवा व्हिडिओ पाहायचे असतील तर त्यामध्ये काय अत्यावश्यक आहे? तर ती माहिती व ती बघण्याठी बॅटरी असणं. त्यातून सिमकार्ड काढलं तरी चालेल. हा एक समवाय संबंध. पण जर त्या फोनवरून बोलायचं असेल. संदेश पाठवायचे असतील तर त्याफोन मध्ये बॅटरीशिवाय सिमकार्ड अत्यावश्यक व ते चालू स्थितीतील असलं पाहिजे. शिवाय तो फोन नेटवर्क म्हणजेच तरंगांच्या सान्निध्यात असला पाहिजे. तरंग म्हणजेच आकाश. हा झाला दुसरा समवाय संबंध. त्यात अधिक माहिती साठवणारी मेमरी चिप असली काय नसली काय त्याने थोडी अडचण येईल अतिरिक्त माहिती झाल्यावर..पण फोन करणे, बोलणे बंद पडणार नाही म्हणून त्या मेमरी चिपशी समवाय संबंध नाही.”

“बरं पण विक्रमा हे सगळं तू सांगतोस खरं. पण या अभ्यासाला सुरुवात कुठून करायची?”

“वेताळा, पदार्थविज्ञान हा माणसांच्या जीवाभावाचा मित्र आहे. पण अतिपरिचयामुळे उपेक्षित आहे. माणूस पदार्थविज्ञान उठता बसता वापरतच असतो. वैशेषिकात ते सूत्रबद्ध केलंय इतकंच. 

प्रशस्तपादऋषींनी म्हटलंय
गुणादीनां पञ्चानामपि निर्गुणत्वनिष्क्रियत्वे ||14||
To the five, Quality and the rest, also belong the character of being devoid of qualities, and that of being without action.
फक्त द्रव्यांनाच गुण(properties) असतात व त्यांच्याच बाबतीत कर्मे(actions) संभवतात. गुण, कर्म, सामान्य, विशेष व समवाय हे निष्क्रीय असतात व त्यांना स्वत:चे कोणतेही गुण नसतात.

म्हणजेच पदार्थाच्या अभ्यासाची सुरुवात ही त्यातील द्रव्यांना हुडकून काढल्यावर सुरु होते. सैनिकाच्या उदाहरणात आधी त्याने तो लोखंडाचा गोळा असावा, पण त्याआधी तो स्थायू किंवा पृथ्वीद्रव्य आहे हे टणकपणावरून ओळखले. प्रथम पृथ्वीद्रव्य ओळखले. या द्रव्यालाच आता बाकीची अंगे म्हणजे गुण, कर्म,सामान्य वगैरे येऊन चिकटणार. उजाडमाळरानावर जसा अग्नि पसरू शकत नाही तसेच द्रव्यांशिवाय बाकीची अंगे शिरु नाहीत. म्हणून द्रव्य ओळखणे ही पहिली पायरी. तर अशी अभ्यासाची सुरुवात झाली”

“अभ्यासाची सुरुवात? अभ्यास म्हणजे कसं शास्त्रज्ञांनी करायची गोष्ट आहे. रणांगणावरचा सैनिक जीव वाचवणार का तुझ्या पदार्थाचा अभ्यास करायला वह्या पुस्तक घेऊन बसणार?”

“अरे वेताळा, अभ्यास किंवा सतत मनन, चिंतन, आकलन करणं हा माणसाचा नैसर्गिक कल आहे. ते त्याच्याकडून सहजच होतं..श्वासोच्छवासासारखं..आता मी श्वास घेतो असं तो ठरवून घेत नाही. तसंच आता मी अभ्यास करतो असं तो ठरवत नाही. त्याचे डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ ही त्याची इद्रिये कायम त्याच्या मेंदूला माहिती पुरवत असतात..ही पडद्यामागे सतत चालणारी प्रक्रीया आहे. तिला जेव्हा सजगपणे जाणतेपणाने माणूस करतो तेव्हा त्याला पदार्थाच्या धर्माचे आकलन किंवा ऋषी प्रशस्तपादांच्या भाषेत पदार्थधर्म..”

“अरे मानवांना ज्यात त्यात धर्म घुसवण्याची फार हौस..असो..मलाही कळतंय की धर्म म्हणजे त्या पदार्थाची असण्याची व वागण्याची विशिष्ट पद्धत..बर तर सैनिकाला पृथ्वीद्रव्य कळलं..आता पुढे सांग..”

“वेताळा इंद्रियांद्वारे जाणवणारी द्रव्ये..म्हणजे या लोहगोळ्याच्या बाबतीत पृथ्वी व त्याचा गरमपणामुळे कळणारे तेज हे द्रव्य कळल्यावर त्याच्या गुण म्हणजे रंग, रूप इत्यादि गुणांचा अभ्यास, मग त्याचे कर्म म्हणजे हालचाल कशी होते हा अभ्यास करायचा. त्यानंतर सामान्य अंग म्हणजे ते द्रव्य कोणत्या गटात मोडते म्हणजे लोखंड हे धातूंच्या गटात मोडते हे कळते. आता गट पाहिल्यावर मग त्या गटातील म्हणजे इतर धातूंपेक्षा ते वेगळे कसे आहे याचा अभ्यास करायचा. त्यासाठी त्या लोखंडाचे लहानात लहान कण केल्यानंतरही काय शिल्लक उरते ते  पाहायचे. लोखंडाच्या बाबतीत त्याचा अणू उरतो. तांब्याच्या अणूपेक्षा तो वेगळा असतो. हे झाले विशेष अंग. मग हे पाहिल्यानंतर ते विशेष असल्यानेच त्या पदार्थाला अर्थ येतो व नसल्यास तो पदार्थच नष्ट होतो का ते पाहायचे. लोखंडाचा प्रत्येक अणू दाटीवाटीने त्या गोळ्यात बसलेला आहे. ते अणू गेले तर तो गोळाच नष्ट होईल. म्हणून त्या लोखंडाच्या अणूचा व त्या गोळ्याचा अतूट किंवा समवाय संबंध आहे. शिवाय त्यातील तेजाचा म्हणजेच उष्णतेचा त्याच्या तापमानाशी अतूट संबंध आहे. तेज गेले की तापमान गेले. म्हणून तेजाचा व तापमानाचा अतूट संबंध आहे.”

“कळला रे अतूट संबंध. पण मला सांग की ही अनेक द्रव्ये एखाद्या पदार्थात असू शकतात. तू म्हटलास तसं तापलेल्या लोखंडाच्या गोळ्यात तेजातील बदलामुळे लोखंडाचे गुण बदलतात. मग मला सांग की यात पदार्थाची कोणकोणती अंगे बदलतात? या बदलाला काय म्हणतात?”

“वेताळा, या बदलाला भौतिक बदल म्हणतात. प्रशस्तपाद म्हणतात
कारणत्वञ्चान्यत्र पारिमाण्डल्यादिभ्य: ||17 ||
The quality of being the cause belongs to all (substances, qualities and actions) except the atomic measure.
दुसऱ्या कशालातरी कारण होणे हे विशेषत्व सोडून बाकी सर्वांना लागू होते.

“कसं कोड्यात बोलल्यासारखं वाटतंय. कारण होणे म्हणजे रे काय?”

“म्हणजे असं बघ वेताळा, पाणी आहे आणि ते विशिष्ट कक्ष तापमानाला आहे. त्याचा स्पर्शगुण (temperature) आपण समजा ३८ अंशांपासून १०० अंशांपर्यंत वाढवत नेला तर त्यातलं पाणी वाफेत परिवर्तित होईल. म्हणजे आप द्रव्यापासून वायू द्रव्यापर्यंतचा बदल. तेच तापमान ० अंशापर्यंत खाली आणलं तर बर्फ म्हणजेच पृथ्वी द्रव्यात रुपांतर. पण तरीही पाण्याचा विशेष रेणू हा पाण्याचा विशेष रेणूच राहिला. जो पर्यंत पाण्याचा रेणू हा तिथे कायम आहे तो पर्यंत तो भौतिकबदल(physical change). जर काही कारणाने जर तो रेणू दुसऱ्या कशाततरी बदलला तर मात्र त्या द्रव्याचे व पर्यायाने पदार्थाचेच अस्तित्त्व संपते तो होतो रासायनिक बदल(chemical change).

“काय रे विक्रमा एकाच विषयात किती विषय घुसवतोस..किती फाटे फोडतोस..पण आता या क्षणी मात्र मला गेलं पाहिजे. वैशेषिकात म्हटलंय तसं काल द्रव्य फार चंचल आहे व आताचा काळ सांगतोय की मला परत गेलंच पाहिजे. पुन्हा येईनच मी विक्रमा या भौतिकबदलांविषयी बोलायला..तोपर्यंत विचार करुन ठेव. चांगली चांगली उदाहरणं शोधून ठेव. येतो मी विक्रमा हाऽहाऽऽहाऽऽऽ”

विक्रमा भोवतीचं जग त्या काळापुरतं तरी विखुरलं. प्रजाजन झोपी गेले. किर्र अंधार झाला. चंद्र पेंगुळला. सारथी मनातल्या मनात विचार करत राहिला की हे चंद्रकला दिसणं..वाढत जाणं..कमी होत जाणं हा कसला बसल असावा बरे..पदार्थविज्ञान गुरुंना विचारलं पाहिजे..

(क्रमश:)

मूळ कथा: विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात

Friday 22 December 2017

पदार्थांमध्ये चालणाऱ्या स्थिर–चर, दृष्य-अदृष्य अशा ९ द्रव्यांच्या खेळाची मजा पाहणे (How to enjoy the intermingling of nine Vaisheshika substances in the context of a Padarth)

पुन्हा एकदा अमावस्या जवळ आली. पुन्हा चंद्रबिंब काळवंडलं. पुन्हा रात्रीची घनगंभीरता वाढली. अमावस्या पौर्णिमेच्या चौकटीत बांधलेल्या काळाच्या प्रत्येक टप्प्यावर राजा विक्रमाच्या त्या राज्यात अनेकविध बदल घडत. शेवटी राज्य म्हणजे तरी काय? केवळ पृथ्वीद्रव्याने भारलेल्या जमिनी, राजवाडे, किल्ले का आपद्रव्याने व्यापलेल्या नदी, ओढे, नाले का वायुरूपाने अच्छादिलेला सर्व परिसर? का याहूनही अजून काही. केवळ भौतिकतावादी दृष्टिकोनातून तरी एवढंच. पण राजा विक्रमाला मात्र उमगलं होतं की त्याचं राज्य हा सुद्धा एका महाकाय पदार्थासारखाच होता. भौतिकतावादा नुसार जरी स्थायू, द्रव, वायू द्रव्यांनी परिपूर्ण असं राज्याचं वैभव असलं तरी याही पुढे त्याच्या राज्यात यज्ञाच्या रूपानं तेजाची आराधना, त्यागाची, सूर्यदेवतेची आराधना चालू होती, विविध मंत्रघोषांच्या, सद्विचारांच्या पावन घोषांच्या स्वरूपात त्याच्या राज्याच्या आकाश तत्त्वात विधायकता भरून राहिली होती. काल तत्वाच्या किंवा दिक् तत्त्वाच्या महाकाय सर्वव्यापी मापदंडांमध्ये त्याच्या राज्यात सर्वत्र विकासच आढळून येत होता. पण या सर्वांचं कारण केवळ त्याचे प्रजाजनच होते. प्रजाजनांची मन तत्त्वं विधायक कामाकडे लक्ष देत असल्याने, त्याचा उत्कर्ष त्यांना दिसत असल्याने, भौतिक सुख परिपूर्ण असल्याने त्याची आत्ततत्वेही सुखाचा अनुभव घेत होती. विक्रमाच राजाला त्याच्यासंबंधी सतत विचार करण्याची एक अशी पद्धतच पडून गेली होती.

“काय रे विक्रमा ही विचारांची पद्धत सुद्धा वैशेषिक गुरूंनी, पदार्थविज्ञान गुरूंनी घालून दिली काय तुला?” नेहमी प्रमाणेच विक्रमाच्या मनाभोवती घुटमळणाऱ्या विचारतरंगांना एखाद्या पुस्तकासारख्या वाचणाऱ्या वेताळाने विक्रमाला विचारले.
विक्रमराजा त्याच्या विचारसमाधीतून बाहेर पडत म्हणाला “तसं म्हणू शकतोस तू. खरेतर एकंदर आपण जेव्हा कोणत्याही गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा यातील काही गोष्टी आपोआपच विचारात घेतो. पण त्यातून काही मुद्दे सुटून जायची शक्यता असते. वैशेषिक आचार्यांनी बहुधा हाच विचार लक्षात घेऊन ही पदार्थाची ६ अंगे, ९द्रव्ये, ५ हालचाली इत्यादि संख्या निश्चित केल्या असव्यात. हेतू हा असावा की त्यातून पडताळणी करण्यासाठी निश्चित अशी यादी समोर असावी.”

“तू चाललास पुन्हा वाहात..थांबमी तुला जरा दिशा देतो..सर्वांच्याच घरात एक तुळशी वृंदावन असते. घरातील लहान मोठे, स्त्री पुरुष याची वेगवेगळ्यावेळी पूजा करतात. तुळस टवटवीत राहावी याची काळजी घेतात. तर मला सांग की हा तुळशीवृंदावन पदार्थ घेतला तर त्यातील नवद्रव्ये कोणती? त्या पदार्थाची ६ अंगे कोणती? थोडक्यात सांग. पाल्हाळ नको.”
“नवीन काळात कुठली रे तुळशी वृंदावने, पण तरीही लहान लहान कुंड्यांमध्ये तुळशी लावतातच.”



प्रशस्तपाद ऋषींनी द्रव्यांगाची लक्षणे सांगताना म्हटलंय की या द्रव्यांना अस्तित्त्व असते, त्यांना व्यक्त करता येते, त्यांना जाणून घेता येते, त्यांचे काही अन्योन्य संबंध असतात, ती संख्येने अनेक असतात, त्यांना गुण असतात, ते  हालचाली करतात, त्यांचा सजीवतेशी संबंध असतो, त्यांचे वर्गीकरण करता येते, त्यांचे काही विशेष अणुरूप, रेणुरूप अस्तित्त्व असते. त्यातील काही नित्य तर काही अनित्य असतात. काहींचा दुसऱ्यांवर परिणाम होतो तर काही नैमित्तिकच असतात. इतर द्रव्यांच्या निर्मितीला यातील काही कारण ठरतात. यातील काहींमध्ये इतर द्रव्ये आश्रयाला येतात तर काही आश्रयाला जातात. प्रशस्तपाद भाष्याच्या तिसऱ्या धड्यात हे सर्व विवेचन आलेले आहे.”

“विक्रमा, सदर्भ दिलास हे छान झालं. आता आपल्या उदाहरणात परत ये.”

तर या तुळशीच्या कुंडीभोवताली ही नवद्रव्ये कशी बागडत असतात ते पाहू. पहिलं म्हणजे पृथ्वीद्रव्य. तर कुंडी ही या द्रव्याची, आतील काळी किंवा लाल माती ही या द्रव्याची, तुळशीचं शरीर हे सुद्धा या पृथ्वी द्रव्याचं. दुसरं म्हणजे आप किंवा जलरूप द्रव्य. सकाळी पूजेच्या कलशातून वा इतर भांड्यातून हे द्रव्य वाहात वाहात वरच्या थरातून मुळापर्यत गेलं. काही मुळांनी शोषून घेतलं. काही मातीच्या कणांना चिकटलं. राहिलेलं गळून निघून गेलं. कारण वाहणं हा या आपद्रव्याचा गुण. शिवाय तुळशीच्या शरीरातील विविध रस, विकरे(enzymes) ही सुद्धा आपद्रव्याची.”

“विक्रमा, जास्त खोलात शिरु नकोस आत्ता..तेजा बद्दल सांग..”

“हो तर वातावरणात असलेली ऊब, ऊष्णता, मुळांच्या भोवती असणारी ऊब हे सर्व तेजाचे प्रकार. उष्णता, गारवा हे तेजाचे लक्षण. आताच्या शास्त्रानुसार ऊर्जेची विविध रूपे ही सुद्धा तेजरूपच. नंतरचे चौथे द्रव्य म्हणजे आकाशद्रव्य. तर या कुंडीभोवती सूर्यकिरणांतून येणारे विद्युत्चुंबकीय तरंग फेर धरून नाचताहेत ते तरंग म्हणजेच आकाशद्रव्य. शिवाय तुळशी कडे पाहून केलेले सद्विचार, म्हटली गेलेली स्तोत्रे हे शब्दतरंग. हे विविध तरंग म्हणजेच आकाशद्रव्याची उदाहरणे. जितके या आकाशात विधायक तरंग तेवढी प्रसन्नता मोठी..”

“विक्रमा, खोलात नंतर शिरूया रे..ही पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश द्रव्ये आपण पाहिली..म्हणजे चार भूतद्रव्ये व आकाश हे महाभूत पाहिले..आता दिक् व काल द्रव्यांविषयी सांग..”

“दिक् व काल ही सर्वव्यापी, सर्वसंचारी द्रव्ये. कधीही एका ठिकाणी न राहणारी. आपली घड्याळे ही केवळ कालाचे दर्शक. सकाळी ७ वाजता तुळशीला पूजेनंतर पाणी घातले. ९ वाजेपर्यंत घरातील सर्वांनी या तुळशीला जवळून, लांबून, कधी हात जोडून, कधी मनातल्यामनात असा नमस्कार केला..ऊन वाढल्यावर घरातील गृहिणीने दुपारी पुन्हा थोडे पाणी घातले. त्या आधी थोडे खुरपले. अशाप्रकारे या काळद्रव्याच्या संदर्भात वेगवेगळ्या गोष्टी घडल्या..”

“अच्छा म्हणजे कालद्रव्य हे केवळासंदर्भाठीच आहे? ते  स्वत: काहीच करत नाही?”

“नाही. ते केवळ संदर्भाला सहाय्य करते. तसेच काहिसे दिक् याद्रव्याचे. याचा अर्थ जागा. त्याच्याही मोजपट्ट्या माणसाने तयार केल्या. म्हणजे तुळशीच्या कुंडीची उंची इतकी, परिघ इतका, तिचे आकारमान इतके. तुळशी आणली तेव्हा एक वीत होती. आता एक फुटाची झाली असे दिक् द्रव्याचे विविध निर्देशक वेगवेगळ्या संदर्भात  येऊन चिकटतात व संदर्भ बदलल्यावर निघून जातात. अशाप्रकारे दिक् ही सुदरी मोजपट्टी. केवळ संदर्भाला साहाय्य करणारी..”

“आता मन व आत्मा..”

“या द्रव्यांसंबंधी स्थूलार्थाने काय बोलावं. कुंडी उचलताना हाताचा जिथे कुंडीशी संयोग झाला तेथे मन येऊन गेलं. नमस्कार करताना, पाहताना पाहणाऱ्याचं मन या तुळशीजवळ आलं व क्षणात उडून दुसरीकडे जाणाऱ्या फुलपाखरासारखं हे मनही दुसरीकडे उडून गेलं..”

“म्हणजे विक्रमा स्थल, काल, मन ही सर्वच अशी संदर्भाबरोबर उडणारी व बसणारी फुलपाखरं आहेत..त्यांचा काहीही परिणाम होत नाही तुळशीवर..”

“वेताळा स्थळ व काळ हीच नैमित्तिक आहेत. पण मनाला शक्ती आहे. मनामध्ये कार्यकारी शक्ती आहे. घरातील कोणी व्यक्ती या तुळशीची प्रसन्नतेने पूजा करत असेल, विधायक विचार करत असेल तर त्या विचारतरंगांमुळे तुळस तजेलदार दिसेल..ती मने ज्या सजीवांशी संबंधित असतात त्यांची आत्मद्रव्येही त्या तुळशीशी निगडित होतात..सुख, दुख, इच्छा, द्वेष हे या आत्म्यांचे गुण..”

“विक्रमा, आत्म्याविषयी तू मला सांगतोस? आत्मा हा सुद्धा न दिसणारा आहे. त्याला देहाश्रयाशिवाय व्यक्त होता येत नाही. म्हणून तर दर अमावस्येला या मृतशरीरात मला प्रवेश करावा लागतो..पण विक्रमा या तुळशी भोवती चालणाऱ्या विविध द्रव्यांच्या खेळासंबंधी सांगून त्यांच्या गुण या अंगाविषयी जाणण्याची उत्सुकता तू अधिकच ताणलीस..पण आता या मृतशरीराचा आश्रय सोडून जाण्याची वेळ झाली..पुन्हा भेटायचंय राजा..विसरू नकोस..हाऽहाऽऽहाऽऽऽ”

झालं..वेताळ गेला तसं आजुबाजूचे सारे स्थिरचर दर अमावस्येप्रमाणेच विचार मंथनात रममाण झाले.. 

“दर अमावस्येला झाकोळला जाणारा चंद्र सुद्धा आपल्याकडे कुणा आत्म्याचं लक्ष नाही हे पाहून स्वत:मधील द्रव्यांचा विचार बहुतेक करू लागला असावा..”त्या रात्री विक्रमा बरोबर आलेल्या राजकवीचने आपली कल्पना बोलून दाखवली..

विक्रमाने स्मितहास्य केलं व म्हणाला “राजकवीच तुम्ही..तुमचा आत्मा कल्पनारंजनाने तृप्त होतो..उद्याच्या सभेत यावर एक उत्तम काव्य तुम्ही ऐकवाच..”

“महाराजांची आज्ञा शिरसावंद्य..” राजकवींनी दुजोरा देत प्रणिपात केला..

विक्रमाने सारथ्याला प्रस्थान करण्याची आज्ञा दिली..अमावस्येचा अंधार आजुबाजूला असला तरी त्या सारथ्याच्या मनातला एक कोपरा ज्ञानाने उजळला होता..  


(क्रमश:)   

Wednesday 20 December 2017

सारांश: पदार्थाच्या नवद्रव्यांमधील साम्य व भेद स्थळे (Summary table: Similarities and differences between the characteristics of 9 constituent substances)


खालील सारणीमध्ये सारांशरूपात पदार्थाच्या पदार्थात असणाऱ्या (किंवा नसणाऱ्या) द्रव्यांची साम्यस्थळे व भेदस्थळे अनुक्रमे हिरव्या व लाल रंगांनी दर्शविण्यात आली आहेत.



साम्य
स्थायू
(solid)
द्रव
(liquid)
वायू
(gas)
तेज
(energy)
आकाश
(plasma)
काल
(time)
दिक्
(space)
आत्मा
(soul)
मन
(mind)
द्रव्यत्वयोग (belonging to class of substance)









स्वात्मन्यारम्भकत्त्वम् (self-productiveness)









गुणवत्त्वम् (having qualities)









कार्य्यकारणविरोधित्वम् (no destructible by the causes and effects)









अन्त्यविशेषवत्त्वम् (being connected with ultimate individualities)









अनाश्रितत्वस(not depending on something else)









नित्यत्त्व (Being eternal)









अनेकत्व (plurality)









अपरजातिमत्व (less extensive class)









क्रियावत्व (actions)









मूर्तत्व (corporeal)









परत्व-अपरत्व (coming close and going far)









वेगवत्व (create motion with force)









सर्वविहारी (All pervasive)









परममहत्त्व (having largest dimensions)









आश्रयकर्ते (being the residing place)









भूतत्व (material)









इन्द्रियप्रकृतीत्व (being the principal material of organs)









बाह्यैकैकेन्द्रियग्राह्यविशेषगुणवत्व (perceptible by each external sense organ)









द्रव्यांच्या निर्मितीचे कारण (material or component cause of substances)









तापमानाने जाणीव (sense of temperature)









प्रत्यक्षत्व (perceptible by senses)









रूपवत्त्व (having colour)









द्रवत्व (having fluidity)









गुरुत्त्व (gravity)









चव (taste)









विशेषगुण (specific individuality)









१४ गुण









क्षणैकैकदेशवृत्तिस(last at one place for moment and move somewhere else )









सर्वोत्त्पत्तिमतां निमित्तकारणत्वं (instrumental cause of all that has origin)









निमित्तकद्रवत्वयोग (fluidity brought about by external causes)